*येत्या २३ जून २०२४ पासून येणाऱ्या अत्यंत मोठ्या वाईट योगाची माहिती देणारा लेख अत्यन्त ज्ञानी ज्योतिषाभ्यासक श्री.भरत नाबरिया यांनी लिहिला आहे. आपल्या पंचांगामध्ये नेहमीच पंधरा-पंधरा दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी ते १४ दिवसांचे पण होतात. तिथींच्या क्षय- वृद्धीमुळे क्वचित ते सोळा दिवसांचेही होतात. पण अतिशय कमी परिस्थितीमध्ये तेरा दिवसांचा पक्ष होतो. अत्यंत क्वचित येणारा असा हा योग असतो. ह्याला 'रौरवकाल योग' असे म्हणतात. ह्या योगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनहानी व धनहानी होत असते. श्रीदत्त माहात्म्यामध्ये सांगितलेल्या सात इती म्हणजे १)अनावृष्टी म्हणजे अजिबात पाऊस न पडणे, २)अतिवृष्टी म्हणजे अत्यधिक पाऊस पडणे, ३)टोळधाड म्हणजे असे किडे जे संपूर्ण अन्नधान्य खाऊन टाकतात. ४)भूकंप ५) परचक्र म्हणजे दुसऱ्या देशाकडून आक्रमण, ६)मोठ्या प्रमाणात संक्रमणामुळे होणारे रोग जसे कोरोना,७) देशात बंड होणे असे अनेक उपद्रव निर्माण होतात. असा योग द्वापारयुगात महाभारत युद्धाच्या आधी तेरा दिवसांचा कृष्णपक्ष आला होता,त्यावेळी आला होता.आता पुन्हा यावेळी २३ जूनला आपल्या देशात असा योग परत येत आहे. ज्येष्ठ कृष्णपक्षात प्रतिपदेचा क्षय होऊन द्वितीयेपासून ज्येष्ठ कृष्णपक्ष सुरू होतोय आणि नंतर त्रयोदशी तिथीचा क्षय झालेला आहे. यामुळे महाराष्ट्रात तेरा दिवसांचा ज्येष्ठ कृष्णपक्ष आलेला आहे. उत्तर-पूर्व भारतात मात्र द्वितीयेचा आणि चतुर्दशीचा क्षय झालेला आहे.त्यामुळे उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर दुर्योग निर्माण झालेला आहे. यामुळे उत्तर भारतात पूर येणे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी,काही ठिकाणी अनावृष्टी, काही ठिकाणी रोगराई, काही ठिकाणी बंड हे असे होऊ शकते. महाभारत काळात दुर्योधनाची सत्ता पालटली होती. या वाईट काळात धर्मशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचा व्रतारंभ,मंगल कार्य, कोणत्याही व्रताचे उद्यापन त्यानंतर घराची, जमिनीची खरेदी विक्री,गृहप्रवेश करू नये. सर्व प्रकारची शुभ कार्ये टाळावीत.याबाबतीत श्री.भरत नाबरिया यांनी आजच दाते पंचांगकर्ते आणि या क्षेत्रातील अधिकारी आदरणीय श्री.मोहनराव दाते यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या महाराष्ट्रात प्रतिपदेचा लोप ...
続きを読む
一部表示